Sunday, 6 November 2011

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत

कुणाची तरी हवी असते

पण असे का घडते की जेव्हा ती
व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?
असे म्हणतात की प्रेम हे शोधून सापडत नसते
प्रेम हे नकळत होऊन जाते
मग तरीदेखील प्रत्येक व्यक्ती
प्रेमाच्या शोधात का असते?
असे म्हणतात की प्रेमात पडल्यावर
सर्व काही सुंदर असते
मग तरीदेखील प्रेमात पडल्यावर
अश्रूंना का स्थान असते?
हे सर्व काही असले तरी
प्रेम हे अतिशय सुंदर असते
पण काही जणांना ते
शोधून ही सापडत नसते.

No comments:

Post a Comment